उपसंहार
संध्याकाळ झाली. सुबोध दिवाणखान्यात बसला होता. समोर शेकोटी पेटली होती. त्याच्या मांडीवर एक पत्र्याची पेटी होती. त्यात त्याच्या काही आठवणी, डायरी,फोटो,पत्र वैगरे होत. अजून काही खास गोष्टी देखील होत्या. शेकोटीची ऊब त्याच्या शरीराला लागत होती. पेटीतील एक एक वस्तू बाहेर काढून तो आपल्या आठवणी जाग्या करत होता. आता याच आठवणी सोबतच त्याने एकट जगायचा निर्णय घेतला होता.
पेटी उघडून त्याने पवनचा फोटो बाहेर काढला. एक नजर त्यावर पडताच त्याचे अश्रू अनावर झाले. त्याने तो फोटो बाजूला ठेवला. आपली डायरी उघडली आणि एक पत्र काढलं त्यातून. ते त्याच पत्र नव्हतं, ना त्याला कोणी ते लिहलं होत. पुढे वाकून त्याने ते पत्र शेकोटीच्या अर्धवट जळलेल्या लाकडावर टाकलं. त्या लाकडाच्या न जळलेल्या भागावर ते पत्र पडलं आणि तो ते पत्र वाचू लागला.